पुणे बहुजननामा ऑनलाईन – नुकतेच पुणे शहरातील कोंढवा येथे भिंत कोसळल्यामुळे अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. त्यात राज्यात असे प्रकार थांबन्याची चिन्ह दिसत नाही यावर कामगार नेते बाबा आढाव यांनी भाष्य केले आहे. शहरात सुरू असलेली सर्व बांधकामे तातडीने थांबवावित आणि बांधकाम मजुरांना महापालिकेने सुरक्षित स्थळी तत्काळ हलवावे, अशी मागणी कामगार नेते बाबा आढाव यांनी केली आहे.
कोंढवा येथे झालेल्या दुर्घटनेनंतर आंबेगाव येथे पुन्हा त्याची पुनरावृत्ती झाली त्यावेळी दुर्घटनास्थळी बाबा आढाव भेट दिली. त्यानंतर ते बोलत होते महापालिकेने बांधकाम व्यावसायिकांना सक्त ताकीद द्यावी. बांधकाम मजुरांच्या सुरक्षिततेकडे लक्ष द्यावे. त्यांच्या झोपड्या पडेपर्यंत वाट पाहून कोरडी सहानुभूती दाखविण्याची गरज नाही.बांधकाम कायद्यात कामगारांसाठी निधी जमा करणे, मजुरांना योग्य त्या सुविधा देणे, निवारा देणे, त्यांच्या मुलांसाठी पाळणा घर तयार करणे यासाठी निधी आहे.परंतु अंमल बजावणी मात्र काहीच नाही अशी काम महानगरपालिका करते त्यामुळे इथून पुढे आता नागरिकांनीच याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
बिल्डर आणि कंत्राटदार यांचे राजकीय लोकांशी लागेबांधे असतात त्यामुळे अशा घटना होतात . सीमाभिंत व्यवस्थित बांधली जात नाही. तसेच कामात चालढकल करायची असल्यामुळे पाया देखील व्यवस्थित घेतला जात नाही. दुसऱ्यांच्या वादात मजुरांना जीवानिशी जाण्याची वेळ येत असल्याचे बाबा आढाव यांनी म्हंटले आहे. त्यामुळे सीमाभिंतीच्या जवळ झोपड्या बांधणे हा गुन्हा मानला गेला पाहिजे. त्यामुळे मजूर कुठल्याही राज्यातील असला तरी त्याला एक भारतीय म्हणून माणुसकीच्या नात्याने मदत करावी, असे देखील बाबा आढाव यांनी सांगितले.
मजुरांकडे काय असणे आवश्यक ?
२००८ साली देशात सामाजिक सुरक्षा कायदा मंजूर झाला
मजुरांची नोंदणी करणे बंधनकारक आहे.
मजुरांकडे वर्कर कार्ड असणे हा कायदा आहे.