एक्स्प्लोर

लोकसभा निवडणूक 2024

UTTAR PRADESH (80)
43
INDIA
36
NDA
01
OTH
MAHARASHTRA (48)
30
INDIA
17
NDA
01
OTH
WEST BENGAL (42)
29
TMC
12
BJP
01
INC
BIHAR (40)
30
NDA
09
INDIA
01
OTH
TAMIL NADU (39)
39
DMK+
00
AIADMK+
00
BJP+
00
NTK
KARNATAKA (28)
19
NDA
09
INC
00
OTH
MADHYA PMADHYA PRADESH (29)RADESH (29(
29
BJP
00
INDIA
00
OTH
RAJASTHAN (25)
14
BJP
11
INDIA
00
OTH
DELHI (07)
07
NDA
00
INDIA
00
OTH
HARYANA (10)
05
INDIA
05
BJP
00
OTH
GUJARAT (26)
25
BJP
01
INDIA
00
OTH
(Source: ECI / CVoter)

उजनीचे पाणी पुन्हा पेटणार, इंदापूरला 5 टीएमसी पाणी देण्याच्या आदेशानंतर वातावरण तापले, पालकमंत्री भरणे म्हणाले... 

सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरणावर तसे राजकारण नेहमीच चालत आलं आहे. मात्र या पाण्याबाबत जिल्ह्यातील जनता फारच आक्रमक असल्याने आता पुन्हा एका शासकीय आदेशाने जिल्ह्यात पुन्हा पाणी तापू लागले आहे.

पंढरपूर : कायम दुष्काळी असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरणावर तसे राजकारण नेहमीच चालत आलं आहे. मात्र या पाण्याबाबत जिल्ह्यातील जनता फारच आक्रमक असल्याने आता पुन्हा एका शासकीय आदेशाने जिल्ह्यात पुन्हा पाणी तापू लागले आहे. एका बाजूला कोरोनाचे जीवघेणे संकट आ वासून उभे असताना जलसंपदा विभागाने काढलेल्या एका आदेशाने इंदापूर तालुक्यातील 22 गावांना दिलासा मिळणार असला तरी संपूर्ण सोलापूर जिल्हा यात होरपळून निघणार आहे. 

उजनी धरणाच्या ऊर्ध्व बाजूस बिगर सिंचन पाणी वापरातून उपलब्ध होणारे सांडपाणी उजनी जलाशयातून उचलून शेटफळगढे येथे नवनी मुठा उजवा कालव्यात किमी 169 येथे सोडून खडकवासला प्रकल्पाचे सिंचन स्थिरीकरण करण्याबाबत जलसंपदा विभागाने काढलेल्या पत्राने सध्या सोलापूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. उजनी धरणातून 5 टीएमसी पाणी इंदापूरला जाणार यावरून सर्वच पक्षातील नेत्यांनी आपल्या टीकेचा रोख बारामतीकडे केला आहे. 

उजनी धरणातील पाण्यावर तसा बऱ्याच मंडळींनी डोळा ठेवल्याने मूळ उजनी धरणाच्या उभारणीतून विस्थापित झालेल्या विस्थापितांवर अन्याय झाल्याची भावना येथील धरणग्रस्त बोलून दाखवत आहेत. तर पालकमंत्र्यांनी पंढरपूर प्रचारात मंगळवेढ्याच्या दुष्काळी 35 गावांचा पाणी प्रश्न सोडवायचे आश्वासन दिल्याची आठवण भाजप उमेदवार समाधान अवताडे यांनी करून दिली आहे. 

हा निर्णय जाहीर होताच करमाळा तालुक्यात सर्वात जास्त उद्रेक व्यक्त होऊ लागला असून या तालुक्यातील अनेक गावेच्या गावे धरण उभारणीत विस्थापित झाली असल्याने केत्तूर येथे शेतकरी नेते अतुल खूपसे यांनी तर थेट पालकमंत्र्यांची प्रतीकात्मक प्रेतयात्रा काढत त्याला उजनी जलाशयात जलसमाधी दिली. वास्तविक अजून उजनी धरणातून मराठवाड्याला द्यायचे 21 टीएमसी पाणीही दिले गेले नाही ना सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी असलेल्या अक्कलकोट , सांगोला , मंगळवेढा , दक्षिण सोलापूर , करमाळा व माढा या भागातील योजना पूर्ण झाल्या आहेत. 

अशा स्थितीत सध्या उजनी जलाशयात असणाऱ्या पाण्याचे 100 टक्के वाटप यापूर्वी झाले असताना हे पाणी कुठून उपलब्ध करणार असा सवाल शिवसेना आमदार शहाजी पाटील आणि भाजप जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी केला आहे. सोलापूर जिल्ह्याचे एक थेंबही पाणी नेऊ देणार नाही असा पवित्र करमाळ्याचे माजी आमदार नारायण पाटील आणि दिग्विजय बगल यांनी घेतली आहे. या प्रश्नावर आता जिल्ह्यातील सर्व राजकीय पक्षाच्या आमदार खासदार यांनी एकत्र येत याला विरोध करावा अशी मागणी आमदार प्रशांत परिचारक यांनी केली आहे.

दरम्यान सर्व जिल्हा अंगावर येऊ लागल्याचे लक्षात येताच पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आपण सोलापूर जिल्ह्याच्या हक्काचे थेंबभरही पाणी इंदापूरला नेणार नाही आणि तसे झाले तर राजकीय सन्यास घेऊ अशी भूमिका घेतली आहे. मात्र असे असेल तर कोरोनाचे एवढे मोठे संकट सुरु असताना हा आदेश निघालाच कसा याचे उत्तर मात्र त्यांचेकडे नाही. उजनीच्या एकूण पाण्यामध्ये हे पाणीही धरूनच हिशोब झालेला असेल तर 5 टीएमसी पाणी शिल्लक राहणार याचे उत्तर जनतेसमोर येणे गरजेचे असल्याची शेतकऱ्यांची मागणी आहे. 

सुरुवातीला बारमाही असलेले उजनी धरणानंतर आठमाही झाले आणि आता तर याचा जास्तीतजास्त वापर पिण्याच्या पाण्यासाठी होत आहे. उन्हाळ्यात जिल्ह्यात सुरु असलेले शेकडो टँकर केवळ उजनीवर अवलंबून असतात. अशात जर हे 5 टीएमसी पाणी देण्याचा निर्णय झाला तर आधीच तहानलेल्या सोलापूर जिल्ह्याचा घसा कायम तहानलेला राहणार आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोदींनी घेतलेले राष्ट्रहिताचे निर्णय हे काही विशिष्ट लोकांना आवडले नाहीत : डॉ. सुभाष भामरे 
मोदींनी घेतलेले राष्ट्रहिताचे निर्णय हे काही विशिष्ट लोकांना आवडले नाहीत : डॉ. सुभाष भामरे 
Ajit Pawar : बारामतीचा निकाल आश्चर्यकारक, मी कमी पडलो; लोकसभेच्या निकालानंतर अजित पवार पहिल्यांदाच बोलले
बारामतीचा निकाल आश्चर्यकारक, मी कमी पडलो; लोकसभेच्या निकालानंतर अजित पवार पहिल्यांदाच बोलले
मोठी बातमी! पराभवानंतर युपीतही मोठी उलथापालथ; भाजप प्रदेशाध्यांचा राजीनामा, दिल्लीत बैठक
मोठी बातमी! पराभवानंतर युपीतही मोठी उलथापालथ; भाजप प्रदेशाध्यांचा राजीनामा, दिल्लीत बैठक
Ajit Pawar : अजितदादांना बंडखोरी नडली? चार पैकी तीन उमेदवार आपटले, राष्ट्रवादीला मोठा झटका
अजितदादांना बंडखोरी नडली? चार पैकी तीन उमेदवार आपटले, राष्ट्रवादीला मोठा झटका
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Headlines : Maharashtra News Update : 11 PM : 06 June 2024 : एबीपी माझा हेडलाईन्सNavneet Rana on Lok Sabha : पराभवानंतर नवनीत राणा पहिल्यांदा कॅमेऱ्यासमोर, म्हणाल्या...जय श्री राम!Devendra Fadnavis Delhi : राजीनामा देण्याच्या निर्णयावर देवेंद्र फडणवीस ठाम, दिल्लीत काय होणार?Devendra Fadnavis Special Report : राजीनाम्याचं केंद्र, काय ठरवणार देवेंद्र? ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोदींनी घेतलेले राष्ट्रहिताचे निर्णय हे काही विशिष्ट लोकांना आवडले नाहीत : डॉ. सुभाष भामरे 
मोदींनी घेतलेले राष्ट्रहिताचे निर्णय हे काही विशिष्ट लोकांना आवडले नाहीत : डॉ. सुभाष भामरे 
Ajit Pawar : बारामतीचा निकाल आश्चर्यकारक, मी कमी पडलो; लोकसभेच्या निकालानंतर अजित पवार पहिल्यांदाच बोलले
बारामतीचा निकाल आश्चर्यकारक, मी कमी पडलो; लोकसभेच्या निकालानंतर अजित पवार पहिल्यांदाच बोलले
मोठी बातमी! पराभवानंतर युपीतही मोठी उलथापालथ; भाजप प्रदेशाध्यांचा राजीनामा, दिल्लीत बैठक
मोठी बातमी! पराभवानंतर युपीतही मोठी उलथापालथ; भाजप प्रदेशाध्यांचा राजीनामा, दिल्लीत बैठक
Ajit Pawar : अजितदादांना बंडखोरी नडली? चार पैकी तीन उमेदवार आपटले, राष्ट्रवादीला मोठा झटका
अजितदादांना बंडखोरी नडली? चार पैकी तीन उमेदवार आपटले, राष्ट्रवादीला मोठा झटका
लोकसभेला वडिलांचा पराभव, लाडकी लेक भावूक; अभिनेत्री नेहा शर्माची खास पोस्ट चर्चेत
लोकसभेला वडिलांचा पराभव, लाडकी लेक भावूक; अभिनेत्री नेहा शर्माची खास पोस्ट चर्चेत
Bhiwandi : भिवंडीत गुन्हे शाखेने सराईत चोरट्यास केले जेरबंद, दहा गुन्हे उघडकीस, सहा दुचाकी केल्या जप्त
भिवंडीत गुन्हे शाखेने सराईत चोरट्यास केले जेरबंद, दहा गुन्हे उघडकीस, सहा दुचाकी केल्या जप्त
मंत्री तानाजी सावंतांच्या मतदारसंघातच ठाकरेंच्या पठ्ठ्याला सर्वाधिक लीड, वाचा किती?; आमदारकीला मोठा संघर्ष
मंत्री तानाजी सावंतांच्या मतदारसंघातच ठाकरेंच्या पठ्ठ्याला सर्वाधिक लीड, वाचा किती?; आमदारकीला मोठा संघर्ष
कार्यकर्त्याला मारहाण, दौरा अर्धवट सोडून निलेश लंके थेट रुग्णालयात; पोलीस अधीक्षकांचंही आवाहन
कार्यकर्त्याला मारहाण, दौरा अर्धवट सोडून निलेश लंके थेट रुग्णालयात; पोलीस अधीक्षकांचंही आवाहन
Embed widget